लॉकडाऊन म्हणजे कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येण्याचा काळ असं प्रत्येकालाच वाटते ,खूप वर्षांनी ही संधी मिळाली म्हणून सर्वांनी सोबत येऊन वेळ घालवावा असाच विचार मुंबईतील एका कुटुंबाने केला होता..कुटुंबातील बरेच जण इमर्जन्सी सर्व्हिसेस मधे असल्याने काळजी सुद्धा घेतली पण तरीही याच कुटुंबातील १८ जण कोरोना बाधित झाले होते,पण प्रबळ इच्छाशक्ती आणि लढवय्या वृत्तीमुळे सर्वांनी कोरोनावर मात केली आहे.