83 चा विश्वकरंडक झाला होता. तो भारतानं जिंकला. त्यानंतर खेळाडूंच्या सत्काराचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र त्यासाठी पैसे नव्हते. अशावेळी लता दीदींच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर जे घडलं त्याचा संपूर्ण देश साक्षीदार आहे. ज्येष्ठ क्रिडा पत्रकार मुकूंद पोतदार यांनी लता दीदींच्या त्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यांनी तो कार्यक्रम ज्या व्यक्तीनं याची देही याची डोळा अनुभवला होता, त्या विजय लोकापल्ली यांच्याशी बातचीत केली आहे